गुलामगिरीची प्रतीके कधी हटणार ?

नवी देहली येथील लुटीयन्स भागातील औरंगजेब मार्ग लिहिलेल्या फलकावर ‘गुरु तेग बहादुर लेन’ लिहिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अधिवक्ता अनुराधा भार्गव यांच्या नेतृत्वाखाली ही कृती करण्यात आली.

पाद्रयांची वासनांधता जाणा !

केरळमधील ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मध्ये कन्फेशनच्या (केलेल्या पापांची चर्चमध्ये पाद्य्रासमोर स्वीकृती देण्याच्या) विरोधात ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून केली आहे.

धर्मांधांची असहिष्णुता जाणा !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मुसलमान तरुणीवर प्रेम केल्यावरून तिच्या रईस खान या वडिलांनी हिंदु तरुण धर्मेंद्र यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला विजेच्या उच्च दाबाच्या तारेने ‘शॉक’ दिला. त्याद्वारे त्यांचा मृत्यू अंगावर वीज कोसळून झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला.

सर्वच घुसखोर रोहिंग्यांना पकडून देशातून हाकला !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील काही जिल्ह्यात घातलेल्या धाडीतून म्यानमारमध्ये रहाणारा रोहिंग्या मुसलमान अजीजुल याला अटक करून  त्याच्याकडून २ बनावट भारतीय पारपत्र, ३ आधारकार्ड, १ पॅनकार्ड आदी कागदपत्रे सापडली.

नेहरूंची अक्षम्य चूक जाणा  !

नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शहा यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता; परंतु नेहरूंनी त्याला नकार दिला, असा दावा माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेंशियल ईअर्स’ या पुस्तकात केला आहे.

महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र बागळण्याचा कायदा हवा !

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथे एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २४ वर्षीय नराधमाला तरुणीने स्वरक्षणार्थ चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले.

धर्मांधांची धर्मनिरपेक्षता जाणा !

रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे स्वच्छेने हिंदु धर्म स्वीकारून स्वतःच्या भूमीवर मंदिर बांधण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांध सरपंचाने साथीदारांसह देवप्रकाश पटेल यांच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. नंतर घराला आग लावून त्यांच्या कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न केला.

धर्मांधांचे खरे स्वरूप जाणा !

एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर ती फोडली पाहिजेत, असे सांगत आतंकवाद्यांचा आदर्श डॉ. झाकीर नाईक याने पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडल्याच्या घटनेचे समर्थन केले.

या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथील विघ्नेश्‍वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्‍वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आली. राज्यात गेल्या १९ मासांमध्ये १२० मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.

अशा काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करा ! 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एका प्रसंगामध्ये गावकर्‍याला ‘तुला हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक आहे का ? ठाऊक असेल, तरच जयंती साजरी कर, नाहीतर केवळ कोंबडी खा’, असे सांगितले.