मनसे न्यायालयात दाद मागणार

मुंबई – महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने किंवा काही कारणाने त्यांना माघार घेणे भाग पाडण्यात आल्याने संबंधित उमेदवार संभाव्य निवडणूक जिंकल्याप्रमाणेच आहेत. विविध पक्षांच्या अशा उमेदवारांची संख्या ७० असून त्यात सर्वाधिक भाजपचे आहेत.
या स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी टीका केली आहे. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशांचे अमीष दाखवल्याचे म्हटले जात आहे.
याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या सभांमध्ये पुराव्यांसह हा विषय मांडणार असल्याचे समजते. या संदर्भात मनसे न्यायालयातही जाणार असल्याची चर्चा आहे, तसेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहे.
संभाव्य बिनविरोध निवड होणार असलेल्यांपैकी ४४ भाजपचे, २२ शिवसेनेचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे, १ इस्लामिक पक्षाचे आणि १ अपक्ष असे उमेदवार आहेत.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !