महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीआधीच ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले !

मनसे न्यायालयात दाद मागणार

मुंबई – महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने किंवा काही कारणाने त्यांना माघार घेणे भाग पाडण्यात आल्याने संबंधित उमेदवार संभाव्य निवडणूक जिंकल्याप्रमाणेच आहेत. विविध पक्षांच्या अशा उमेदवारांची संख्या ७० असून त्यात सर्वाधिक भाजपचे आहेत.

या स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी टीका केली आहे. यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशांचे अमीष दाखवल्याचे म्हटले जात आहे.

याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या सभांमध्ये पुराव्यांसह हा विषय मांडणार असल्याचे समजते. या संदर्भात मनसे न्यायालयातही जाणार असल्याची चर्चा आहे, तसेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहे.

संभाव्य बिनविरोध निवड होणार असलेल्यांपैकी ४४ भाजपचे, २२ शिवसेनेचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे, १ इस्लामिक पक्षाचे आणि १ अपक्ष असे उमेदवार आहेत.