गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा निर्णय
(कोंम्बिग ऑपरेशन म्हणजे पोलीस किंवा सुरक्षादलांनी विशिष्ट भागातील गुन्हेगार, संशयित व्यक्ती किंवा अवैध गोष्टींचा शोध घेणे.)

नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – शांतीनगर, वडाळा (मुंबई) येथील कांदळवनाच्या भूमीवर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचे अतिक्रमणाच्या विरोधात वन विभाग अन् पोलीस विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून १५ आणि १६ डिसेंबर या २ दिवसांमध्ये ‘कोंम्बिग ऑपरेशन’ करून अतिक्रमण काढण्यात येईल, तसेच पुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. भाजपचे प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषदेमध्ये उपस्थित केली होती.
गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, ‘‘वर्ष २०१२ मध्ये कांदळवन दक्ष विभागाची स्थापना करण्यात आली. कांदळवनामध्ये १८४ पेक्षा अधिक सुरक्षा बलातील जवानांची सुरक्षा गस्त घालण्यात येत आहे. येत्या ६ महिन्यामध्ये कांदळवनाची ‘गूगल मॅपिंग’ पूर्ण करण्यात येईल. त्यातून अतिक्रमण थांबवण्यास साहाय्य होईल. आतापर्यंत वन विभाग आणि गृह विभाग यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आलेली नाही.’’ एक विषय अतिक्रमणाचा आणि दुसरा अतिक्रमण केलेल्यांनी रोहिंग्या किंवा घुसखोरी बांगलादेशी नागरिकांना झोपडी विकणे हा आहे. यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. कांदळवनाचे क्षेत्र असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर या विभागांमध्येही आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री कदम म्हणाले.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !