
लातूर – जिल्ह्यात पुन्हा पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबरला सकाळपासून सतत पाऊस कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात पाणी आले असून धरणांतून विसर्ग चालू आहे. रेणापूर प्रकल्प (रेणा नदी) मध्ये दिवसाकाठी ४ दरवाजे उघडण्यात आले असून अनुमाने ४,९८७.५३ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मांजरा धरण प्रकल्पातून अनुमाने १,७४७.१४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. तावरजा मध्यम प्रकल्पामध्येसुद्धा १० से.मी. उघडलेले दरवाजे असून अनुमाने २३० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठावरील आणि पुरामुळे बाधित होऊ शकणार्या गावांतील नागरिकांना सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !