
लातूर – जिल्ह्यात पुन्हा पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबरला सकाळपासून सतत पाऊस कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यातील नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात पाणी आले असून धरणांतून विसर्ग चालू आहे. रेणापूर प्रकल्प (रेणा नदी) मध्ये दिवसाकाठी ४ दरवाजे उघडण्यात आले असून अनुमाने ४,९८७.५३ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. मांजरा धरण प्रकल्पातून अनुमाने १,७४७.१४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. तावरजा मध्यम प्रकल्पामध्येसुद्धा १० से.मी. उघडलेले दरवाजे असून अनुमाने २३० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठावरील आणि पुरामुळे बाधित होऊ शकणार्या गावांतील नागरिकांना सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत