केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रष्ट यंत्रणा केली उघड

नागपूर – प्रतिवर्षी खराब होणारे रस्ते नगरसेवक, ठेकेदार आणि अभियंते यांना हवे असतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले. अब्जावधी भारतियांच्या नशिबी कुणामुळे खड्डेमय रस्ते आले आहेत. कोणती भ्रष्ट यंत्रणा रस्ते खड्ड्यात घालते, हे त्यांनी यातून उघड केले. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’, नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजिनिअरिंग’ विषयावरील २ दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्रात ते बोलत होते.

ते म्हणाले की, ‘खासगी प्रॅक्टिस’ चालत नसलेले अधिवक्ता आणि वास्तूविशारद सरकारकडे आहेत. सरकारी अभियंत्यांमधील ‘चल जाता है’ वृत्ती धोकादायक आहे. या वृत्तीला राजकारणी आणि मंत्रीही उत्तरदायी आहेत. अभियंत्याने त्याच्या कामात तडजोड करायला नको. आयआयटी अभियंते असूनही कामे दर्जेदार होत नाहीत.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान