केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रष्ट यंत्रणा केली उघड

नागपूर – प्रतिवर्षी खराब होणारे रस्ते नगरसेवक, ठेकेदार आणि अभियंते यांना हवे असतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले. अब्जावधी भारतियांच्या नशिबी कुणामुळे खड्डेमय रस्ते आले आहेत. कोणती भ्रष्ट यंत्रणा रस्ते खड्ड्यात घालते, हे त्यांनी यातून उघड केले. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’, नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजिनिअरिंग’ विषयावरील २ दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्रात ते बोलत होते.

ते म्हणाले की, ‘खासगी प्रॅक्टिस’ चालत नसलेले अधिवक्ता आणि वास्तूविशारद सरकारकडे आहेत. सरकारी अभियंत्यांमधील ‘चल जाता है’ वृत्ती धोकादायक आहे. या वृत्तीला राजकारणी आणि मंत्रीही उत्तरदायी आहेत. अभियंत्याने त्याच्या कामात तडजोड करायला नको. आयआयटी अभियंते असूनही कामे दर्जेदार होत नाहीत.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !