
मुंबई – महाराष्ट्रात सातत्याने होत असलेल्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्ह्यांतील ४१ सहस्र ६७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १३ सहस्र ७२४ नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये हालवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जालना येथे ८ सहस्र ५००, छत्रपती संभाजीनगर ८ सहस्र २९, धाराशिवमधील ३ सहस्र ९५७, अहिल्यानगर ३ सहस्र ४९७, बीड २ सहस्र, नांदेड येथे १ सहस्र २० जणांना निवारा केंद्रांत हालवण्यात आले आहे. यांव्यतिरिक्त ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, परभणी या जिल्ह्यांतही काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. या सर्व नागरिकांसाठी १२ जिल्ह्यांत मिळून १४७ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव