
पुणे – विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘संभाजी’ कादंबरीत त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असून महाराज यांच्या विषयी खोटी, आक्षेपार्ह आणि अपकीर्तीकारक माहिती दिली असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. विश्वास पाटील यांनी क्षमा मागून लिखाण मागे घ्यावे अन्यथा सातारा येथे होणारे ‘९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ होऊ देणार नाही, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली. पाटील आणि ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ यांना त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (काही ना काही निमित्त काढून विश्वास पाटील यांना विरोध करून जातीयवाद पसरवण्याचे संभाजी ब्रिगेडचे नेहमीचे षड्यंत्र ! – संपादक)
| छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी संशोधन करून लेखन केले आहे. काही चूक राहिली असेल, तर ती दुरुस्त करण्यास आणि दिलगिरी (स्वकीय शब्द माहित नाही) व्यक्त करण्यास मी सिद्ध आहे; मात्र आक्षेप स्पष्टपणे सांगावेत, अशी मागणी ‘संभाजी’ कादंबरीचे लेखक आणि ‘९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे निर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली आहे. |
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !