मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष’ याविषयी घरोघरी प्रवचनातून प्रबोधन करण्यात आले. ४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वरील जिल्ह्यात एकूण ४३५ ठिकाणी प्रवचने झाली. यामधून ४ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. या प्रवचनातून श्राद्ध म्हणजे काय ? श्राद्धाचे महत्त्व, आपत्काळात श्राद्ध कसे करावे ? श्राद्ध न केल्याने काय अडचणी येऊ शकतात ? श्री दत्तगुरूंचा जप केल्याने काय लाभ होतो ? असे मार्गदर्शन करण्यात आले. जिज्ञासूंनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. ‘श्राद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करू आणि श्रद्धेने श्राद्धविधी करू’, अशा प्रतिक्रिया अनेक जिज्ञासूंनी या वेळी दिल्या.
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण