सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्षा’विषयी प्रबोधन !

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत  ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष’ याविषयी घरोघरी प्रवचनातून प्रबोधन करण्यात आले. ४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वरील जिल्ह्यात एकूण ४३५ ठिकाणी प्रवचने झाली. यामधून ४ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. या प्रवचनातून श्राद्ध म्हणजे काय ? श्राद्धाचे महत्त्व, आपत्काळात श्राद्ध कसे करावे ? श्राद्ध न केल्याने काय अडचणी येऊ शकतात ? श्री दत्तगुरूंचा जप केल्याने काय लाभ होतो ? असे मार्गदर्शन करण्यात आले. जिज्ञासूंनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. ‘श्राद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करू आणि श्रद्धेने श्राद्धविधी करू’, अशा प्रतिक्रिया अनेक जिज्ञासूंनी या वेळी दिल्या.