
पुणे, २२ सप्टेंबर (वार्ता.) – पितृपक्षात पुणे जिल्ह्यात ‘पितृपक्ष आणि आनंदी जीवनासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचने घेऊन मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला. श्राद्धविधी का करावेत ? श्राद्ध करण्याचे लाभ, त्याचे महत्त्व, पितरांना गती मिळण्यासाठी कोणत्या धार्मिक कृती कराव्यात ? या विषयावर प्रवचनाच्या माध्यमातून जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक आणि हितचिंतक यांनी जाणून घेतले.




प्रवचनांच्या समवेतच अनेक ठिकाणी दत्तगुरूंच्या सामूहिक नामजपाचे नियोजनही केले होते. अनेक भजनी मंडळे, गृहनिर्माण संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, धर्मशिक्षणवर्ग, शाखा आदी ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. हस्तपत्रक वितरण, फलकलेखन आदींच्या माध्यमातूनही पितृपक्षाच्या संदर्भातील विषय समाजापर्यंत पोचवण्यात आला. बालसंस्कारवर्गात येणार्या लहान मुलांनीही या पितृपक्षात दत्तगुरूंचा सामूहिक नामजप नियमित करण्याला महत्त्व दिले. पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !