महाराष्ट्रात ८ महिन्यांत १ सहस्र १८३ शेतकर्‍यांची आत्महत्या

काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – सरकारने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवले. शेतकर्‍यांना साहाय्य न देता केवळ समित्या नेमल्या. अतीवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, बँकाही कर्ज देत नाहीत, हातात काहीच राहिले नाही; म्हणून हतबल शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या ८ महिन्यांत महाराष्ट्रात १ सहस्र १८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.