सुरक्षेसाठी २२ ऑगस्टला मध्यरात्री ते २३ ऑगस्टला सायंकाळपर्यंत चौथर्यावरील दर्शन बंद !

अहिल्यानगर – २३ ऑगस्टला श्रावणात शनि अमावास्येचा योग जुळून आल्याने शनिशिंगणापूरला यात्रौत्सव आहे. त्यासाठी विश्वस्त, देवस्थान प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांच्या वतीने नियोजन चालू आहे. शनि अमावास्येनिमित्त ४ लाखांहून अधिक भाविक शनिदेवाच्या दर्शनाला येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने देवस्थान प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे, असे देवस्थान प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले यांनी सांगितले. चौथर्यावरचा तैलाभिषेक या काळात बंद असला, तरी भाविक चौथर्यासमोरूनही शनिदेवास तेल वहात असतात.
२२ ऑगस्टला मध्यरात्री महाआरती होण्यापूर्वी ते २३ ऑगस्टला सायंकाळची आरती संपेपर्यंत चौथर्यावरील शनिदेव दर्शन बंद असणार आहे, तर शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मात्र भाविकांना शनिदेवाचे दर्शन खुले असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत मंदिर दर्शन बंद ठेवण्यात येते.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !