सुरक्षेसाठी २२ ऑगस्टला मध्यरात्री ते २३ ऑगस्टला सायंकाळपर्यंत चौथर्यावरील दर्शन बंद !

अहिल्यानगर – २३ ऑगस्टला श्रावणात शनि अमावास्येचा योग जुळून आल्याने शनिशिंगणापूरला यात्रौत्सव आहे. त्यासाठी विश्वस्त, देवस्थान प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांच्या वतीने नियोजन चालू आहे. शनि अमावास्येनिमित्त ४ लाखांहून अधिक भाविक शनिदेवाच्या दर्शनाला येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने देवस्थान प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे, असे देवस्थान प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले यांनी सांगितले. चौथर्यावरचा तैलाभिषेक या काळात बंद असला, तरी भाविक चौथर्यासमोरूनही शनिदेवास तेल वहात असतात.
२२ ऑगस्टला मध्यरात्री महाआरती होण्यापूर्वी ते २३ ऑगस्टला सायंकाळची आरती संपेपर्यंत चौथर्यावरील शनिदेव दर्शन बंद असणार आहे, तर शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मात्र भाविकांना शनिदेवाचे दर्शन खुले असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत मंदिर दर्शन बंद ठेवण्यात येते.
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !