मुंबईतील दहीहंडी उत्सवात ३१८ गोविंदा घायाळ, तर दोघांचा मृत्यू !

(दहीहंडी फोडणार्‍या गटातील सदस्यांना ‘गोविंदा म्हणतात.)

मुंबई – मुंबईतील दहीहंडी उत्सवात ३१८ गोविंदा घायाळ झाले असून त्यापैकी २९४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २४ गोविंदांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर २ गोविंदांचा मृत्यू झाला. एक जण उंच मनोर्‍यावरून पडल्याने, तर दुसर्‍याचा मृत्यू दहीहंडीसाठी रोप बांधतांना तोल गेल्याने झाला.