साध्वी प्रज्ञासिंह यांचा सनातन धर्मसभा, वसईच्या अध्यक्षांकडून सत्कार !

साध्वी यांचे धैर्य, संयम आणि संघर्ष यांना वंदन केल्याचा उल्लेख !

साध्वी प्रज्ञासिंह यांचा सनातन धर्मसभा, वसईच्या अध्यक्षांकडून सत्कार

वसई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, दिग्विजय सिंग आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक ‘भगवा आतंकवाद’ जन्माला आणला. २६/११ च्या आक्रमणात कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर त्या घटनेतही हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याचे काँग्रेसने षड्यंत्र रचले होते.’’