Malegaon Blast Verdict : काँग्रेसच्या ‘हिंदु आतंकवादा’चा खोटा डाव उघड ! – भाजप

भाजप नेते रविशंकर प्रसाद

नवी देहली – काँग्रेसने रचलेल्या ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पनेचा कट आता उद्ध्वस्त झाला आहे. कोणत्याही आरोपीच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नव्हते. काश्मीरमध्ये आतंकवादाविरुद्ध लढणार्‍या कर्नल पुरोहित यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर त्यांच्या मोटरसायकलचा वापर बाँबस्फोटासाठी झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना इतके त्रास देण्यात आले की, त्या चालण्यासही असमर्थ झाल्या. हा सगळा काँग्रेसचे मतपेढीच्या राजकारणासाठी आखलेला कट होता. आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.