‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे यांची चेतावणी

ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांचे बलीदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा, यांमुळे आज आम्ही अभिमानाने ‘मराठा’ म्हणून उभे आहोत. महाराजांचे एकेरी नाव उच्चारणे, हा आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर तिने तिच्या नावात पालट करून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करावे, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल, अशी चेतावणी ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिली. येथे २९ जुलैला आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत दीपक काटे बोलत होते.
‘महापुरुषांचे नाव जपणे, हे आपल्या प्रत्येकाचे दायित्व आहे; पण ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय लाभातून बघत आहेत’, असा आरोप काटे यांनी केला. अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड जात असतांना दीपक काटे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना अडवले. त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या चेहर्याला काळे फासले. त्यानंतर आता पुन्हा एकदा काटे यांनी संभाजी ब्रिगेडला चेतावणी दिली आहे.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद