
‘समाजातील काही लोक रस्त्यावर विक्रीला ठेवलेले किंवा हॉटेलमधील तेलकट आणि मसालेदार पदार्थ आवडीने अन् पुष्कळ खातात. असे पदार्थ खाल्ल्यावर ते आजारी पडतात किंवा त्यांना शारीरिक त्रास चालू होतात. तेव्हा ते वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) येतात. वैद्य रुग्णांना औषधे देतात. तेव्हा रुग्ण औषध घेतांना वैद्यांना ४ – ४ वेळा विचारतात, ‘‘डॉक्टर, या औषधांचा काही दुष्परिणाम होणार नाही ना ?’’ मात्र रुग्णाला बाहेरचे, रस्त्यावरचे किंवा हॉटेलचे खातांना ‘अन्न स्वच्छ आणि खाण्यायोग्य आहे का ? त्यातील तेल कोणते आहे ? पदार्थ किती दिवसांपूर्वीचे आहेत ? चिकन, मटण किंवा मासे हे किती दिवसांपासून साठवून ठेवले आहेत ? अन्न ताजे आहे कि शिळे आहे ?’, असे कोणतेही प्रश्न पडत नाहीत. ‘त्या अन्नाचा आपल्या शरिरावर काय दुष्परिणाम होईल ?’, याचा रुग्ण विचारही करत नाही.’
– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक तंबाखूमुक्त !
भिवंडीत ‘मिथेनॉल’चा ५ सहस्र ९२९ किलो साठा जप्त !