Indians kidnapped :  माली देशात आतंकवाद्यांकडून ३ भारतीय नागरिकांचे अपहरण

बामको (माली) – आफ्रिका खंडातील माली देशातील विविध भागात आतंकवादी आक्रमणे झाल्यानंतर तेथे ३ भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. भारताने या प्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे.

अपहरण करण्यात आलेले भारतीय कायेस येथील सिमेंट कारखान्यात काम करत होते. या कारखान्याच्या परिसरात झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते.