
मुंबई, २ जुलै (वार्ता.) – शेतकर्यांच्या विविध प्रश्नांविषयी विरोधकांनी प्रस्ताव सादर करावा, त्यावर ३ जुलै या दिवशी सभागृहात पूर्ण दिवस चर्चा करण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ जुलै या दिवशी स्पष्ट केले; मात्र तरीही ‘शेतकर्यांच्या आत्महत्या, त्यांच्या सोयीबीन खरेदीत झालेला अपव्यवहार, यांसह शेतकर्यांच्या इतर समस्यांवर आजच चर्चा करावी’, अशी आक्रमकपणे मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सरकार शेतकर्यांना साहाय्य करत आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात. आम्ही चर्चा करायला सिद्ध आहोत. आम्ही चर्चेतून पळवाट काढत नाहीत. शेतकर्यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत. आम्हीही शेतकरी आहोत. एखाद्याकडून वेगळ्या प्रकारचे वक्तव्य झाले असेल, तर त्याचे कुणीच समर्थन करत नाही.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !