पाकचे नाव नकाशातून गायब करण्याची भारताची क्षमता ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

मुंबई – पाकने बेईमानी केली. पाकने अशाप्रकारे याआधीही अनेकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आपल्या नागरिकांवर पाकने आक्रमण केले; मात्र याचे उत्तर पाकला देण्यात आले आहे. पाक परत आक्रमण करेल, हे भारतीय सैन्याला ठाऊक होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्याविषयी कुठलीही ‘पोस्ट’ केली नव्हती.

पाक वारंवार या गोष्टी करणार असेल, तर त्याला धडा शिकवला जाईल. कुत्र्याचे शेपूट वाकडे असल्याने ते कापले जाते. वेळ पडल्यास पंतप्रधान तेही करतील. पाकने त्याच्या क्षमतेप्रमाणे राहिले पाहिजे; अन्यथा नकाशावरून त्याचे नाव गायब करण्याची भारताची क्षमता आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते येथे माध्यमांशी बोलत होते.