नवी देहली – भारत आणि पाक यांच्यातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात चालू असलेली आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. आय.पी.एल्. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय – बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आली. या स्पर्धेचे बाद फेरीचे १२ सामने अद्याप शेष आहेत. ८ मे या दिवशी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एक सामना रहित करण्यात आला होता. येथे ‘ब्लॅकआऊट’ (जाणीवपूर्वक वीज खंडित करणे) करण्यात आल्याने सामना रहित करण्यात आला. स्पर्धा पुन्हा कधी चालू होईल ?, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.