
पंढरपूर – केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आतंकवाद्यांची केंद्रे उद्ध्वस्त करून पहलगाम येथे आतंकवाद्यांनी निष्पाप हिंदूंच्या केलेल्या हत्यांचा सूड घेतला. ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी !’, या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या संत वचनाप्रमाणे भारतीय सैन्याने कामगिरी पूर्ण केली. या संदर्भात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकार यांचे वारकर्यांच्या वतीने अभिनंदन ! भगवान पांडुरंग आपणास पापी, दुरात्मा, दुष्ट, आतंकवाद्यांच्या नाशासाठी बळ देवो, ही प्रार्थना, असे प्रसिद्धीपत्रक ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रणीत वैदिक हिंदु वारकरी बहुउद्देशीय सेवा संघा’चे प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प. आनंद महाराज अहीर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.