
आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा समाधी सोहळा नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. कार्तिकी यात्रेमध्ये लाखो भाविकांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने शिणवटा काढण्यासाठी कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. माऊलींच्या समाधीवर गरम पाणी, तसेच दह्यादुधाने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदाचा काढाही देण्यात आला. ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर समाधीला चोळून दर्शन घेत होते. योग्य नियोजन केल्याने अधिकाधिक भाविक आणि आळंदीकर ग्रामस्थ यांनी प्रक्षाळपूजेचा लाभ घेतला असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !