
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात २ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे स्वामीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा; अन्यथा स्वामीभक्त त्यांना चोपून काढतील, अशी चेतावणी अक्कलकोट येथे पोलीस ठाण्यात जमलेल्या स्वामीभक्तांनी दिली. ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्या वेळी ही चेतावणी देण्यात आली.
या प्रसंगी अक्कलकोटचे भाजप आमदार श्री. सचिन कल्लाणशेट्टी, ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. जन्मजेयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी (चौळप्पा महाराजांचे वंशज) श्री. आण्णु महाराज, श्री. मंदार महाराज पुजारी, श्री. धनंजय महाराज पुजारी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संजय देशमुख यांसह संत, पुजारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी ज्ञानेश महाराव यांनी तोडलेले अकलेचे तारे !
संभाजी ब्रिगेडने आयेजित केलेल्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव म्हणाले होते, ‘सायंकाळी चालणार्या मालिकेत काय चालते, तर ‘स्वामी-स्वामी’ ! प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची बायको म्हणते की, ‘वरून उडी मारली तरी स्वामी वाचवतील’, मग अशांनाच ऑलिंंपिकमध्ये पाठवले पाहिजे. सगळे जर स्वामींमुळे होत असले, तर शरद पवार यांनी गेली ५० वर्षांत राजकारण असेच केले का ? काही योजना राबवल्या नाहीत का ? शाळा उभ्या केल्या नाहीत ? अधिकोष उभे केले नाहीत ?’
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान