
कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक काम केले; मात्र युतीसमवेत असतांना त्यांनी २३ पैकी १८ जागा जिंकल्या. यंदाही ते पुष्कळ फिरले; मात्र ९ जागा जिंकल्या. वर्ष २०१९ मध्ये युती कायम राहिली असती, तर ज्यांना घरी जायचे होते त्यांना १३ आणि ८ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असून त्यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आले म्हणून ठपका बसला. ‘हा भगवा नाही, तर हिरवा विजय असल्याचे मनसेच्या एका नेत्याने चांगले विश्लेषण केले आहे’, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे दौर्यावर आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व असून त्यांना पाठवू त्या ठिकाणी यश कसे मिळेल ? हे ते पहातात. आज पक्ष चालवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे. भाजपमध्ये पुष्कळ अधिक कार्यकर्ते असल्याने एकच व्यक्ती २ दायित्व पार पाडत नाहीत, त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पालटावे लागणार आहे.’’
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन