शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

कोल्हापूर – शंकराचार्य यांचे स्थान हिंदु धर्मात सर्वाेच्च आहे. त्यामुळे करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्यावर होणारी टीका, मठावर मोर्चा काढण्याची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांनी दिली आहे. शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे. शंकराचार्यांचा निषेध करण्यासाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’च्या वतीने चित्रदुर्ग मठात बैठक घेण्यात आली. त्यात ही मागणी करण्यात आली.