श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य ! – वीर सावरकर

प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य धर्मयुद्धाला सज्ज होऊन रावणाचा वध केला, तेव्हा त्यांचे ते कृत्य महत्तम होते. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे.

(साभार : ‘लंडनची बातमीपत्र-४४’, विजयादशमीचा उत्सव, दिनांक २६ सप्टेंबर १९०९)