
नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रशासनाच्या निकषानुसार महाराष्ट्रातील ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. अन्यही काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे; परंतु राज्य सरकार दुष्काळसदृश स्थिती असलेल्या शेतकर्यांनाही हानीभरपाई देणार आहे. आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात हानीभरपाई म्हणून १० सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हानीभरपाई देण्यासाठी २ हेक्टरचा निकष ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या हानीविषयी विधानसभेत स्थगन प्रस्ताव उपस्थित करण्यासाठी अध्यक्षांकडे अनुमती मागितली होती. वडेट्टीवार यांनी शेतकर्यांना हानीभरपाई देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन