नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रशासनाच्या निकषानुसार महाराष्ट्रातील ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. अन्यही काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे; परंतु राज्य सरकार दुष्काळसदृश स्थिती असलेल्या शेतकर्यांनाही हानीभरपाई देणार आहे. आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात हानीभरपाई म्हणून १० सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हानीभरपाई देण्यासाठी २ हेक्टरचा निकष ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या हानीविषयी विधानसभेत स्थगन प्रस्ताव उपस्थित करण्यासाठी अध्यक्षांकडे अनुमती मागितली होती. वडेट्टीवार यांनी शेतकर्यांना हानीभरपाई देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यशासन शेतकर्यांच्या पाठीशी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
राज्यशासन शेतकर्यांच्या पाठीशी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नूतन लेख
- मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !
- यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई महायुतीची उमेदवारी !
- महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची आणि न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया ! – पालकमंत्री उदय सामंत
- मंडणगड : ५ गावांतील महाविकास आघाडीच्या सहस्रो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !
- गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यास, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी एकत्रित !
- Water Shortage : गोवा – वेळूस आणि म्हादई नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती-बागायतींना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता