आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान !

गोहत्ती (आसाम) – एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. याविषयी आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘ही पुष्कळ दुःखद घटना आहे. जर अशी घटना आसाममध्ये घडली असती, तर पोलिसांनी ५ मिनिटांत त्यांचा हिशेब केला असता; मात्र तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अकबरुद्धीन यांचे प्रसारसभेत भाषण चालू असतांना पोलिसांनी त्यांना प्रचाराची वेळ संपली असल्याचे सांगत भाषण थांबवण्याची विनंती केली होती. त्यावर अकबरुद्धीन यांनी ‘अजून ५ मिनिटे शिल्लक असून मला थांबवणारा अद्याप कुणी जन्माला आलेला नाही’, अशी धमकी दिली होती.
सौजन्य इंडिया टूडे
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !