मुंबई येथे वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाची आत्महत्या !

सध्याच्या तरुण पिढीमधील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !

मुंबई – वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाने वर्षांच्या मुलाने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११.३० वाजता वडिलांनी मुलाकडून भ्रमणभाष हिसकावून घेतल्याने तो नाराज झाला होता. घरातील सर्व जण झोपायला गेल्यावर त्याने वरील प्रकार केला. सकाळी उठल्यावर वडिलांना त्याने गळफास घेतल्याचे दिसले. ‘मुलगा जिवंत आहे’, या आशेने त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले; पण तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.

संपादकीय भूमिका

शासनकर्ते, पालक, शिक्षक, समाज आदींकडून मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्‍वगुरु’ असल्याचे सांगणार्‍या भारताला लज्जास्पद !