
१. सौ. वृंदा अजय मुक्तेवार (महिला शहर प्रमुख, शिवसेना), अमरावती
अ. ‘आश्रमात पोचताच माझ्यात नवचैतन्य निर्माण झाले.
आ. आश्रम पाहून माझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
इ. माझ्या मनातील उत्साह द्विगुणीत झाला, तसेच माझे मन प्रसन्न होऊन माझी आध्यात्मिक ओढ वाढीस लागली.’
२. श्री. विनीत दि. पाखोडे (अध्यक्ष, श्री पिंगळादेवी संस्थान, नेर पिंगळाई), अमरावती.
अ. ‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.
आ. हा आश्रम पुष्कळ चैतन्यमय आहे.’
३. अधिवक्ता गजानन य. फडतरे, मु. खातवळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात यायला मिळणे’, हे माझे परम भाग्यच आहे.
आ. येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’
४. सौ. स्मिता उ. रानडे, रामेश्वरी, नागपूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमाचे कामकाज बघून मला पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील शिस्त आणि साधकांची सेवा बघून मला वेगळीच अनुभूती आली.
आ. आम्हाला पुष्कळ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या आश्रमाला भेट देता आली. त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो.’
५. श्री. निखिल अंबिलवादे, जिल्हा जालना
अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद मिळाला, तसेच साधना करण्यासाठी ऊर्जा मिळाली. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
६. मानसी म. कोठावळे, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले आणि शिकायला मिळाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : जून २०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !