भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित न केल्‍यास त्‍याचे इस्‍लामीकरण होण्‍यास वेळ लागणार नाही ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्ता सुभाष झा

भारतात हिंदु आपल्‍या अस्‍तित्‍वाची लढाई लढत आहेत. गेल्‍या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्‍तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्‍यानमार, पाकिस्‍तान आदी देश भारतापासून तोडण्‍यात आले. यातील अनेक इस्‍लामी राष्‍ट्रे झाली. सध्‍या भारताचे इस्‍लामीकरण करण्‍याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्‍हा अनेक तुकडे करून त्‍याचे विभाजन केले जाईल, या धोक्‍याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे. भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित केले नाही, तर देशाचे इस्‍लामीकरण होण्‍यास वेळ लागणार नाही.