एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्यांना नैवेद्य स्वरूपात दिले. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.

साल म्हणे वासुदेवाला ‘धन्य मी झाले ।
झाला तव करस्पर्श मजला’ ॥ १ ॥
आंब्याची फोड म्हणे नारायणाला ।
पूर्ण होऊ दे तव भेटीची ओढ ॥ २ ॥
मुखात जायी श्रीहरीच्या ।
गोड गोड आंब्याची फोड ॥ ३ ॥
फोडीत भरला गोडवा तव भक्तीचा ।
गोड रस गळतो हा अमृततत्त्वाचा ॥ ४ ॥
फोडीतील गोडव्याला ना कशाची तुलना ।
हे प्रभो, नैवेद्य हा स्वीकारावा, हीच आर्त प्रार्थना ॥ ५ ॥
– कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.५.२०२२) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती