ओडिशामध्ये पाऊस आणि वीज पडून १२ जणांचा मृत्यू

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशात भुवनेश्‍वर, कटकसह अनेक भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याची घटना घडली आहे. यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले आहेत.

हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. वीज कोसळल्याने ८ गुरांचाही मृत्यू झाला आहे.