
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०९ अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या महामार्गावर अपघात झाल्यास १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याचे व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिले. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
याविषयी अधिक माहिती देतांना दादाजी भुसे म्हणाले,‘‘नियंत्रण सुटणे, झोप येणे, मागून वाहनाने धडक देणे, तांत्रिक बिघाड आदी कारणामुळे समृद्धी महामार्गावर ५३ अपघात झाले आहेत. आतापर्यंत या महामार्गावरील सर्व अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी चारचाकी वाहने, अवजड वाहने आणि अतिजड वाहने यांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत. या महामार्गावरून जाणार्या सर्व बसचालकांची ‘अल्कोहोल’ (मद्यप्राशन केली आहे का ? याविषयीची चाचणी) चाचणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणार्या १ सहस्र ३०० जणांवर या महामार्गावर कारवाई करण्यात आली आहे.’’
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन