कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

संतप्त नागरिकांकडून निदर्शने

कन्याकुमारी (तमिळनाडू) – येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

कन्याकुमारीचे पोलीस अधीक्षक हरि कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, आम्हाला ठाऊक नाही की, पुतळ्याची तोडफोड झाली आहे कि नाही ? मूर्तीची थोडी हानी झाली आहे. आम्ही गुन्हा नोंदवला असून चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सतर्क रहाण्यास सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशा घटना पोलिसांना लज्जास्पद !