झारखंडमध्ये ५ नक्षलवादी ठार !

प्रतिकात्मक छायाचित्र

रांची – राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वेळी घटनास्थळावरून २ ‘एके ४७’ रायफली जप्त करण्यात आल्या. या भागात सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ३ एप्रिलला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालू झाली. ही चकमक लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांतील लाव्हालौंगच्या रीमी गावालगत घडली. त्यात गौतम पासवान आणि चार्ली नामक नक्षलवादी मारले गेले. गौतम पासवान लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांत कारवाया करत होता.