
कोल्हापूर – जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने गायमुखावर २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र आयोजित केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून या अन्नछत्राचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी झालेली गर्दी लक्षात घेऊन या वर्षी २ लाखांहून अधिक यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील, या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण सिद्धता करण्यात आली आहे.


यात्रा काळात भाविक रात्री-अपरात्री डोंगरावर पोचतात, तरी कुणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणून हे अन्नछत्र २४ घंटे चालू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सन्मति मिरजे, किरण शहा उपस्थित होते.
( सौजन्य : channel B)
प्रमोद पाटील पुढे म्हणाले,
‘‘यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत असतात. त्यांना पोटभर जेवण मिळावे, याकरता ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने भोजन देण्यात येते. गायमुखावर उभारण्यात येत असलेल्या या अन्नछत्रासाठी १५ सहस्र चौरस फुटांचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचसमवेत चहासाठी वेगळा मंडप उभारण्यात आला आहे.’’
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !