रत्नागिरी विमानतळाचे ‘लोकमान्य टिळक विमानतळ’ असे होणार नामकरण

रत्नागिरी – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान करण्यात आले आहे. ८ दिवसांत त्याविषयी अध्यादेश निघेल. रत्नागिरी विमानतळाचे नामकरण ‘लोकमान्य टिळक विमानतळ’ असे करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. गूगलवर शोध घेतला तर, तेथेे लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव दिसते; मात्र, ते अधिकृत नाही. आता याविषयी आम्ही अधिकृत निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘ऑनलाईन’ झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतेच महत्त्वाच्या ४ बैठका झाल्या. याला सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. आंबा बागायतदारांसाठी ‘स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना’ करण्याचा पहिला ठोस निर्णय घेण्यात आला.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !