
सोलापूर – हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले. या वेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात कायदा करण्याचीही मागणी केली.
ते म्हणाले, ‘‘मी सर्वांना आवाहन करतो की, राजकारणाचे हिंदुकरण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कायद्याची संमती हवी असेल, तर हिंदूंनी मतपेढी सिद्ध करणे आवश्यक आहे. राजा कट्टर हिंदुत्वनिष्ठ असेल, तरच हिंदूंचे (हिंदुत्वाचे) रक्षण होईल. रामराज्य हवे असल्यास राजा श्रीराम हवा. हिंदूंनी सावध होऊन राजकारणाचे हिंदुकरण करणे आवश्यक आहे. स्वतः १०० टक्के मतदान करणारी मतपेढी सिद्ध केली, तरच सर्व मागण्या पूर्ण होतील. महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी मोर्चे निघत आहेत. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना मोर्चे काढत आहेत.’’
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !