रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

तरी म्हणवितो साधक स्वतःला, ही खंत वाटे मनाला ।
श्री गुरूंची आहे अगम्य कृपा, न कळे ती मज पामराला ।
तरी म्हणवितो साधक स्वतःला, ही खंत वाटे आज मनाला ॥ १ ॥
कठोर आणि अप्रिय वाणी माझी दाखवली आजवर जगाला ।
कुणासही समजून घेतले नाही, ही खंत वाटे आज मनाला ॥ २ ॥
करितो प्रयत्न नाना प्रकारे, अखंड मार्गदर्शन श्री गुरूंचे मिळे ।
तरी जाणत नाही स्वभावदोष अन् अहं यांना, ही खंत मनाला वाटे ॥ ३ ॥
भेटती पदोपदी साधक अनेक, त्या योगे गुरुवचनांचा लाभ मिळाला ।
परंतु नाहीच माझ्यात अंकुर प्रीतीचा, ही खंत वाटे आज मनाला ॥ ४ ॥
सेवा वा साधना नसे परिपूर्ण, तरी गुरु सांभाळती मज अज्ञान्याला ।
नाही कुवत उत्तम शिष्याची, ही खंत वाटे आज मनाला ॥ ५ ॥
न कळे स्वभावदोष, न कळे भावजागृती, न कळे श्री गुरूंची प्रीती ।
तरीही करितो श्री गुरुचरणी प्रार्थना, अखंड कृतज्ञता राहो मनी ॥ ६ ॥
– अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर, महाराष्ट्र. (७.४.२०२०) (मृत्यूपूर्वी केलेली कविता, मृत्यूदिनांक २८.४.२०२१) (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती