केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांची स्पष्टोक्ती

नवी देहली – राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही, असे परखड मत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मांडले.
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा, संविधान की शपथ लेने वाला कोई शख्स समान नागरिक संहिता का विरोधी कैसे हो सकता है #AgendaAajtak22 https://t.co/X1ou6dWAI5
— AajTak (@aajtak) December 9, 2022
राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते, अशी काही प्रकरणे आहेत. येथे समानता दिसत नाही. ते पुढे म्हणाले की, भारतात बुरखा घालण्यावर बंदी नाही; मात्र शाळा किंवा महाविद्यालये यांचे काही नियम असू शकतात. त्यामुळे तेथे हिजाब (स्त्रियांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध असू शकतात. ज्यांना हिजाब घालायचा आहे, ते ज्या महाविद्यालयांमध्ये तसे घालण्याची अनुमती आहे, तेथे जाऊ शकतात.
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !