निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

पोरबंदर (गुजरात) – येथील गोसा गावात निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या ‘भारतीय राखीव बटालियन’च्या २ सैनिकांमध्ये वाद झाला. या वेळी एका सैनिकाने केलेल्या गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू झाला, तर १ सैनिक घायाळ झाला. घायाळ सैनिकावर उपचार चालू आहेत. २६ नोव्हेंबरला ही घटना घडली. ‘हा वाद कशामुळे झाला’, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !