‘दिवसभरात ८ पेले पाणी प्यावे’, हे योग्य आहे का ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९३

वैद्य मेघराज पराडकर

‘शरिराला किती पाणी आवश्यक आहे’, हे प्रदेश, वातावरणातील उष्णता किंवा थंडावा, शरिराला होणारे श्रम, आहार इत्यादी अनेक घटकांवरून ठरत असते. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०२२)