
आळंदी (पुणे) – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने सोडून इतर जड वाहने यांना १७ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आळंदी परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सेवा सुविधा आणि नियोजन करण्यात आले आहे.
एस्.आर्.पी.एफ्.च्या ३ तुकड्या, एन्.डी.आर्.एफ्.च्या २ तुकड्या आणि बी.डी.डी.एस्.ची २ पथके साहाय्यासाठी बोलवण्यात आली आहेत. यात्रेच्या परिसरात मंदिर आणि आळंदी शहर, तसेच परिसरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन