हिंदु जनजागृती समितीचा सुराज्य अभियानाच्या अंतर्गत उपक्रम

सोलापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे आषाढी आणि कार्तिकी या २ यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात. शासन आणि प्रशासन यांच्याकडून मात्र पुष्कळ अल्प सुविधा वारकर्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्यांना प्रत्यक्ष लाभ व्हावा, यासाठी प्रशासनाने नियोजनातील त्रुटी सुधारून वारकर्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत प्रशासनाकडे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार (महसूल) दत्तात्रय मोहोळे यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गणेश वास्ते, श्री. शुभम एकबोटे, श्री. निखिल बोगा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !