
मुंबई – राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आमदारांचा २ सहस्र ५१५ या लेखाशीर्षांतर्गत निधीतील मूलभूत सुविधांची कामे रहित केल्यानंतर हा निधी वितरित करून सरकारने आमदारांना दिलासा दिला आहे.
राज्यात २८७ विधानसभा आणि ६३ विधान परिषदेचे सदस्य आहेत. या सर्व आमदारांना स्थानिक विकासनिधीतील निधी संमत केला आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर १ सहस्र ४६८ कोटी रुपयांचा बोजा पडतो. एकाचवेळी मोठ्या निधीचा बोजा पडू नये; म्हणून प्रत्येक मासाला १० टक्के निधी वितरित करण्याचे धोरण ठरवण्यात आले होते. यापूर्वीच्या सरकारने मे, जून आणि ऑगस्टपर्यंतच्या निधीचे वितरण केले आहे. आता दिवाळीच्या काळात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या २ मासांचा निधी वितरित केला आहे. यानुसार प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात