गरबा मंडपात घुसल्यास हातपाय तोडू ! – बजरंग दलाची मुसलमानांना चेतावणी

बजरंग दलाचे विभाग समन्वयक तन्नू शर्मा

इंदूर – पुढील काही दिवसांत नवरात्रोत्सव चालू होणार आहे. देशभरात मोठ्या थाटात गरब्याचे आयोजन करून श्री दुर्गामातेची पूजा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर यांनी ‘गरबा खेळण्यासाठी येणार्‍यांचे ओळखपत्र पाहून त्यांना गरबा मंडपात प्रवेश द्या’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उषा ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर काही घंट्यातच ‘गरबा मंडपात घुसल्यास हातपाय तोडू’, अशी चेतावणी मुसलमानांना दिली आहे.

१. बजरंग दलाने म्हटले की, मुसलमान समाजाने गरबा मंडपांपासून दूर रहावे; कारण मुसलमान तरुण वेगवेगळ्या मार्गाने गरबा मंडपांमध्ये प्रवेश करतात आणि नंतर हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘लव्ह जिहाद’ करतात.

२. यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. बजरंग दलाचे विभाग समन्वयक तन्नू शर्मा यांनी म्हटले, ‘गरबा मंडपामध्ये मुसलमान तरुण दिसला, तर तो २ पायांवर येईल; पण चार खांद्यावर जाईल.’

बजरंग दल गरबा मंडपात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणारे फलक लावणार

येत्या काही दिवसांत इंदूरमधील सर्व गरबा मंडपात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणारे आणि मुसलमान तरुणांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासंबंधीचे फलक लावण्यात येतील. नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील गरबा मंडपांमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, असेही तन्नू शर्मा यांनी सांगितले.