
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ ऑगस्ट (वार्ता.) – देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस्.पी. बघेल यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय कळसे, युवा उद्योजक श्री. दीपक पटेल, ईश्वरपूर येथील माजी नगराध्यक्ष श्री. निशिकांतदादा पाटील, हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री भावेश पटेल, नीलेश पटेल, महेश पटेल, हेमंत पटेल, हार्दिक पटेल आदी उपस्थित होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली