
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ ऑगस्ट (वार्ता.) – देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस्.पी. बघेल यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय कळसे, युवा उद्योजक श्री. दीपक पटेल, ईश्वरपूर येथील माजी नगराध्यक्ष श्री. निशिकांतदादा पाटील, हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री भावेश पटेल, नीलेश पटेल, महेश पटेल, हेमंत पटेल, हार्दिक पटेल आदी उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !