
कोलंबो – हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ‘इकॉनॉमिस्ट’ या अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. श्रीलंकेने भारताचा विरोध डावलून चीनच्या ‘युआन वांग ५’ या हेरगिरी करणार्या जहाजाला श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर येण्याची अनुमती दिली होती. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. रानिल विक्रमसिंघे पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत आपण हिंद महासागरातील वर्चस्वाची लढाई दूर ठेवू शकलो होतो; परंतु आता समतोल कायम राखणे फार कठीण बनले आहे. हिंद महासागर हे महासत्तांच्या शक्ती प्रदर्शनाचे केंद्र बनू शकते.’’
संपादकीय भूमिका
|
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani