
१. ‘साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या रथयात्रेत चालायला मिळत आहे’, या विचाराने मन आनंदी आणि निर्विचार होणे
रथोत्सवात भगवंताच्या कृपेने मला ध्वज हातात घेऊन सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. सर्वत्र नामाचा गजर चालू होता. सभोवतालचे वातावरण चैतन्यमय झाले होते.
२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा निसर्गदेवतेलाही पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला जाणवले.
३. ‘आम्ही सर्व साधक वैकुंठात चालत आहोत. त्या वेळी आकाशात सूक्ष्मातून देवता दिसत आहेत’, असे मला जाणवले.
४. साधिकांनी नृत्य केल्यावर ‘वातावरण कृष्णमय झाले’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान असलेला रथ श्री रामनाथ मंदिराजवळ आल्यावर साधिकांनी नृत्य केले. त्या वेळी वातावरण कृष्णमय झाले होते.
५. मार्गात उभे असतांना ध्यान लागणे
काही क्षण माझे ध्यान लागले. एका साधकाने मला हलवून पुढे चालायला सांगितले. ‘मार्गात उभे असतांना ध्यान लागणे’, हे मी प्रथमच अनुभवत होतो.
६. रथोत्सवात सातत्याने माझा भाव दाटून येऊन मला हुंदके येत होते.
७. मी रथोत्सवाच्या वेळी पुष्कळ वेळ उभा होतो. मी अनवाणी चाललो, तरीही मला थकवा आला नाही.
‘हे भगवंता, हे गुरुदेवा, तुम्हीच मला या अनुभूती दिल्यात’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. दिलीप ज्ञानेश्वर नलावडे, खडपाबांध, फोंडा, गोवा. (२२.५.२०२२)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या चित्रांवरील काचेत व्यक्तीची प्रतिमा आरशाप्रमाणे स्पष्ट दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !